पवार घराणे

शिवकालीन इतिहास ...

१३ जानेवारी इ. स.१७०९ (किंवा १७१०) शिवरायांचे अंगरक्षक वीर जीवाजी महाले (संकपाळ) यांची पुण्यत १३ जानेवारी इ.स.१७६१ डिसेंबर-जानेवारी मधे अन्नाविना मराठ्यांची बरीच जनावरे, घोडे मेले. १३ जानेवारी रोजी उपाशी पोटी सर्व सैन्य रनांगणावर लढाईसाठी उतरले. सैन्य पूर्ण खचलेले होते. १३ जानेवारी इ.स.१७७९ वडगावचा तह रघुनाथरावाशी संपूर्णपणे वाकडे धरू नये, असे तुकोजी होळकर, मोरोबादादा फडणीस आणि सखारामबापू यांना वाटत होते. यातूनच बारभाईत मतभेद वाढू लागले. सखारामबापू आणि मोरोबादादा फडणीस यांनी पेशवाईचा मालक सवाई माधवराव पण रघुनाथरावाने वडिलकीच्या नात्याने कारभार करावा, असा बेत करून १७७८ च्या मार्चमध्ये पुणे ताब्यात घेतले; पण महादजी शिंदे फौजेनिशी पुण्यास येऊन दाखल झाले व मोरोबाच्या कटाची इतिश्री झाली; मोरोबास कैद करून पुढे १८०० पर्यंत तुरूंगात ठेवण्यात आले. याच सुमारास मुंबई कौन्सिलने पुरंदर तहाच्या विरूद्ध कंपनीच्या संचालकांकडे तक्रार करून युद्ध चालू ठेवण्याचा हुकूम मिळविला. रघुनाथरावाला घेऊन कंपनीची छोटी फौज पुण्याच्या दिशेने निघाली. तळेगावजवळ तिला वेढण्यास येऊन वडगावचा अपमानकारक करार १३ जानेवारी १७७९ रोजी मान्य करावा लागला. यावेळी सखारामबापूंचा शत्रूपक्षाशी झालेला पत्रव्यवहार उघडकीस आला आणि बापूंना कैद झाली. नाना फडणीसांना सर्वाधिकार प्राप्त झाले. पुढे कलकत्त्याहून सेनापती टॉमस गोडार्डच्या हाताखाली दुसरी फौज सुरतला येऊन दाखल झाली. युद्धास पुन्हा तोंड फुटले आणि १७८२ च्या मे महिन्यात सालबाईच्या तहाने ते थांबले. रघुनाथरावास सालिना तीन लाख रु. देऊन त्याने कोपरगावी रहावे असे ठरले. जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! मराठा

आपली टिप्पणी जोडा

आमचा पत्ता

३०८ , गणेश पेठ, पुणे, महाराष्ट्र 411 001

फोन : ९८२२३४९७१२

फोन : ८०८७१००७७७

फोन : ९१७२५८५०४५

ईमेल : pawargharane@gmail.com

लोकप्रिय उपक्रम