पवार घराणे

आमचा इतिहास

धार चे प्रशासक मराठा पवार महाराजा

परमार पवार राजांचा राज्यकाळ

इस सन १३१० ते १७०७ पर्यंत परमार वंश ₹ महाराष्ट्र आणि वैनगंगा या प्रदेशात स्थिरावत होता. माळवा आणि धार वर पुन्हा पवार राज्य ( मराठा पवार ) : सन १७२५ ते १९४७ - ४८ पर्यंत. छत्रपती शाहूंचे मराठा सरदार उदाजीराव पवारांनी सन १७२३ मध्ये माळवा प्रदेश जिंकला पण नंतर बाजीराव पेशवा यांच्याशी वाद झाल्याने त्यांचे छोटे बंधू आनंदराव पवार यांना सन १७३२ ते १७३५ पर्यंत त्यांना धार चे राजे बनवले गेले
  • विक्रमादित्य प्रथम : इसा से ५७ वर्षा पूर्वी
  • द्वितीय विक्रमादित्य : ४ थे शतक _ कालिदास च्या वेळी
  • कृष्णराज उर्फ उपेंद्र : सन ८०० ते ८२५
  • वाक्पंती प्रथम ; सन ८७५ ते ९१४
  • वाक्पंती द्वितीय / मुंजदेव : सन ९७४ ते ९९७
  • सिन्धुलराज /नव शशांक : सन ९९७ ते १०१०
  • राजा भोजदेव प्रथम : सन १०१० ते१०५५
  • जयसिंह : सन १०५५ ते १०५९
  • उदायादित्य : सन १०८० ते १०८६
  • जगदेव परमार : सन १११६ ते ११६८
  • नरवर्मनदेव : सन ११०४ ते११३३ ( भाई ल्क्ष्मणदेव नन्दीवर्धन ( नागपूर ) चे महाराज
  • यशोवर्मन : सन ११३३ से ११४२
  • जयवर्मन : सन ११४२ ते ११६०
  • विंध्यवर्मन : सन ११६० ते११९३
  • सुभातवर्मन : सन ११९३ ते १२१०
  • अर्जुनवर्मन : १२१० ते १२१६
  • देवपाल : सन १२१६ ते १२४०
  • जयतुर्गादेव : सन १२४० ते १२५६
  • जयवर्मन द्वितीय : १२५६ ते १२६१
  • जयसिंह तृतीय : सन १२६१ ते १२७०
  • अर्जुनवर्मन द्वितीय : सन १२७० ते १२८०
  • भोजदेव द्वितीय : सन १२८० से १३१० ( अल्लाउद्दिन खिलजी कडून पराभव )
पवार घराण्याचा दर्जा पूर्वी पासून फार उच्च कुलीन आहे. हे घराणे राजपूत असून दक्षिणेत ९६ कुळी मराठ्यात सामील झाले. पवार घराण्याला पूर्वी पासून वेदोक्तांचा अधिकार आहे. कृष्णाजी राजे पवार यांना ब्रम्हेन्द्र स्वामी यांनी लिहिलेल्या पत्रात असा उल्लेख आहे की तुम्ही (कृष्णाजी राजे पवार विश्वासराव) जातीने क्षत्रिय, सात जाती दिल्लीहून आल्या त्यात तुमची जात उत्तम आणि तुम्हास सूर्य गायत्री आणि यज्ञोपावीत (जाणवे) होते.. उत्तर हिंदुस्तानात मावळ व राजपुताना ह्या प्रांतात परमार उर्फ पवार ह्या घराण्याचे राज्य कित्येक शतके चालू होते. मुस्लिमांच्या आगमना नंतर उत्तरेतील हिंदू साम्राज्यास उतरती कळा लागून पुढे राज्य लयास गेले, तेव्हा त्यांच्या घराण्याच्या अनेक शाखा निरनिराळ्या मुलखांत जाऊन स्थायिक झाल्या. त्यातील एक शाखेचा उदय महाराष्ट्रात १७व्या शतकाच्या आरंभास झाला.

महाराष्ट्र्रातील मूळ पुरुष - साबुसिंग पवार

साबुसिंग पवार (इ.स. १६xx - १६५७) हिंदवी स्वराज्य स्थापनेत समावेश निजामशाही मुलखात अहमदनगरजवळ, हंगे गावाच्या रानात (कांबरगावच्या डोंगर घटात) साबुसिंगांचे प्रथम ठाणे होते. त्यांनी घोडेस्वार व पायदळ जवळ बाळगले होते. ह्याच सुमारास शिवाजी महाराजांनी हिंदू शूरवीर एकत्र करून स्वराज्य स्थापनेचे स्थापनेचे पवित्र कार्य चालविले होते. महाराजांनी साबुसिंगस हाताशी धरले. तोरणगड मोहिमेत साबुसिंह पवार छत्रपती शिवाजी महाराजां सोबत होते. इ.स. १६५८ (शके १५७९) मध्ये कोकण प्रांत हस्तगत करण्यासाठी महाराजांनी कल्याणवर स्वारी केली. त्यावेळी साबुसिंगनी मोंगल फौजेवर चाल करून पराक्रम गाजविला. पुढे त्यांनी अहमदनगर सुभ्यात सुखेवाडी ऊर्फ सुपे गाव वसविले. ह्या गावाची पाटीलकी त्यांच्या कामावर खुश होऊन शिवाजी महाराजांनी त्यास दिली. १८ ऑक्टोबर १६५७ (शके २६ अश्विन १५८०) रोजी साबुसिंग पवार ठार झाले.

सरदार कृष्णाजी साबुसिंग पवार कृष्णाजी (इ.स. १६yy - १६zz) नावाचा साबुसिंगना एकुलता पुत्र होता, त्यांची गणना शिवाजी महाराजांच्या खास पागेच्या तेहतीस सरदारांत होतसे. महाराजांनी विजापूरकरांच्या मुलखावर ज्या स्वार्या केल्या त्यात कृष्णाजी पवार यांनी प्रामुख्याने भाग घेतला होत. अफझल खान ह्यास महाराजांनी इ.स. १० नोव्हेंबर १६५९ (शके १९ कार्तिक १५८१) मध्ये प्रतापगडावर ठार मारले. त्या प्रसंगी व त्यानंतर अफझल खानाचा मुलगा फाजल खान ह्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत कृष्णाजी पवारांनी शौर्य गाजविले. कृष्णाजी पवारांच्या कामगिरीवर खुश होऊन शिवाजी महाराजांनी त्यांना कणगी व करणगाव इनाम दिले. सुपे गावी त्यांची गाडी असून, एक शिवालयही बांधले आहे. कृष्णाजी एकाकी आजारी पडून वारले. त्यांना तीन पुत्र होते व तिघेही मोठे शूर होते. बुबाजी, रायाजी व करोजी; हे तिघेही शिवाजी महाराजांच्या लढ्यात सामील असत. दक्षिनाकडील कर्नाटकच्या मोहिमेत हे तिघेजण होते. पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत बुबाजी, रायाजी व केरोजी हे त्रिवर्ग बंधू अधिक वैभवास चढले. छत्रपति संभाजी महाराजांच्या वधानंतर मराठेशाहीवर जे भयंकर संकट कोसळले, ते दूर करण्यासाठी, ज्या मराठा सरदारांनी प्राण पणाला लावून शत्रूशी झुंज दिली त्यात ते त्रिवर्ग बंधूही होते.

स्वराज्रा रक्षक - बुबाजी, रायाजी व केरोजीराजाराम महाराजांनी टाकलेल्या विश्वासामुळे औरंजेबाच्या मोगल फौजेचा सामना करण्यासाठी, बुबाजी व केरोजी यांनी मातब्बर फौजा बाळगून वऱ्हाड आणि गंगाथडी मुलखात मोगल फौजेस हैराण करून सोडले आणि मोगलांच्या मुलखात चौथाई व सरदेशमुखी हे मराठ्यांचे हक्क प्रस्थापित करून तापी खोर्यापर्यंत स्वराज्याचा अंमल बसविला व त्यामुळे मराठ्यांचा दरारा वाढला. या कामगिरीतच एकदा मोंगल रसद लुटीत असताना मराठ्यांचा शूर सेनापती संताजी घोरपडे शत्रू सेने कडून अचानक घेरला गेला तेव्हा बुवाजी पवारांनी त्यास सोडवून आणले इ .स. १६९४ मध्ये संताजी मोंगलास येत असलेली रसद लुटीत असताना मोंगल अधिकारी हिम्मत खान याने घेरले तेव्हा बाबूजी पवार यांनी आपल्या फौजेसह हिम्मत खानवर अचानक हल्ला करून आलेले संकट टाळले. या कामगिरीमुळे राजाराम महाराज प्रसन्न झाले. त्यांनी बुबाजीस ‘विश्वासराव’ हे सन्मानाचे पद व ‘विश्वासराई’ सरंजाम दिला आणि केरोजीस ‘सेनाबारासहस्री’ हि बहुमानाची पदवी व वस्त्रे दिली. राजाराम महाराज खूश झाले व त्यांनी किताब बहाल केले, ही गोष्ट जगजाहीर झाली. विश्वासाची सर्व कामे राजाराम महाराजांनी या बंधुवर सोपवली आणि त्यांनी ती स्वामी निष्ठेने पार पाडली. पवार बंधूंनी शूर व सशास्त्रकुशल लोकांची सेना उभारून वर्हाड व गंगाथडी मुलखात मोंगलांची फौज गर्भगळीत केली, त्यामुळे मराठांच्या दरारा वाढला. सबब राजाराम महाराजांनी जिंजीहून महाराष्ट्रात परत आल्यावर त्यांना बहुमानाची वस्त्रे दिली. इ.स. १६९९ मध्ये छत्रपतींच्या सेवेत खानदेशात असताना मोगलांनी बुबाजीस घेरले, जिवंत वाघ पिंजर्यात अडकला. त्यास आशिर-गडावर भिंतीती जिवंत चिणून ठार मारले. तिन्ही भावांची घराणी - सुप्यात असलेले बुबाजीचे मोठे पवार घराणे "विश्वासराव", रायाजी यांचे "वाघळे" आणि केरोजी यांचे "नगरदेवळे" ह्या नावाने प्रसिद्धीस आली.

श्री छत्रपती चरणी तत्पर

  • छत्रपती शिवाजी महाराज:- साबुसिंह पवार, कृष्णाजी पवार कृष्णाजी पवार महाराजांच्या खास पागेच्या तेहतीस सरदारात गणना..
  • छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज:- बुवाजी पवार, रायाजी पवार, केरोजी पवार राजाराम महाराजांकडून बुवाजीस विश्वासराव हे सन्मानाचे पद तर विश्वाराई हा सरंजाम दिला गेला. केरोजीस सेनाबारासहस्त्री हि बहुमानची पदवी दिली.
  • छत्रपती शाहू महाराज :- काळोजी पवार,संभाजी पवार.. काळोजी पवार छत्रपती शाहू महाराजांचे अव्वल भरवशाचे महाप्रतापी सेनापती होते. त्यांना सुभेलष्कर हा सन्मानदर्शक हुद्दा होता. काळोजी पवार यांचे चार पुत्र होते. काळोजी पवार यांच्या मृत्यू नंतर त्यांचे जेष्ठ पुत्र कृष्णजी पवार यांना सेनापंचसहस्त्री व सरसुभा हा सन्मानीय खिताब दिला. कृष्णजी पवार व उदाजी पवार यांना हुजरतीची खासा फौज देऊन कोकणात मोहिमेवर पाठवले. उदाजी पवार यांनी खासा सिद्धी अंबर चे शीर कापून आणले. वाडी पाचाड हस्तगत केले. महाड व बाणकोट किल्ले जिंकून घेतले. कृष्णजी पवार मोहिमेत कामी आल्याने त्यांचे खिताब त्यांचे पुत्र बुवाजी यांना दिले. पुढे बुवाजीना पराक्रमाने सेनासाहेब सुभा व सरलष्कर व सेनाधुरंधर हा खिताब दिला. सेनापतीस जो मानपान निशाण व दर्जा होता तोच निशाण मानपान व दर्जा सेनाधुरंधर या पदास होता. बुवाजी पवार यांचे जेष्ठ पुत्र माधवराव पवार पानिपत युद्धात उजव्या बाजूस जे प्रथम सैन्य होते त्यात आपल्या पथका सोबत होते. त्यांच्या पलीकडे कृष्णजी जिवाजी व यशवंत राव पवार होते. माधवराव पवार या या लढाईत वाचले तर राजे यशवंतराव पवार कामी आले.

पवार सरदार यादी

    शिवपुर्व काळ

  • पवार विश्वासराव .
  • सरदार रामजी विश्वासराव.
  • शहाजीराजे यांचे बंधु शरिफजी यांच्या पत्नी याच विश्वासराव घराण्यातील होत.
  • विजयराव सिधोजी विश्वासराव .

    शिवकाळ

  • शाबुसिंग पवार
  • सरदार कृष्णाजी पवार ,
  • यशवंतराव रामाजी विश्वासराव,
  • शिवराज्ञानी सोयरबाईसाहेब यांची कन्या दिपाबाईसाहेब यांचा यशवंतरावांशी विवाह.

    राजाराम महाराज काळात

  • सरदार बुबाजी पवार ,
  • रायाजी पवार
  • केरोजी पवार

    ताराराणीसाहेब काळात

  • काळोजी पवार ( नंतर शाहु पक्षात )
  • संभाजी पवार

    थोरले शाहु काळ

  • काळोजी पवार , ( शाहु पक्षात प्रवेश )
  • काळोजीस चार पुत्र खालील प्रमाणे -
    • कृष्णाजी पवार ,
    • तुकोजी पवार ( देवास थोरली पाती )
    • जिवाजी पवार ( देवास धाकटी पाती),
    • सरदार मनाजी पवार,
    • सरदार ऊदाजी पवार,
    • सरदार बुवाजी पवार,
    • महाराजा राजे यशवंतराव पवार ( पानिपतमध्ये खर्ची ).

हिस्ट्री ऑफ द मराठा

कुळाचे नाव पवार वंश सुअर्यवंश,सोमवंश , गादी धारगिरी गादी, निशाण लाल ध्वज त्यावर हनुमान, देवक धारेचे शस्ञ , गोञ वशिष्ठ .

धारवरून महाराष्ट्रत आल्यावर पवार घराण्याचा वास्तव प्रथम नगर जिल्ह्यात सुपे येथे होता नंतर पुणे जिल्ह्यातील मलठण, वाघाळे, अमदाबाद,कवठे , हिंगणी, पाथरे, वरडे,चिथणी, इत्यादी. गावात होते. तेथून पुढे पवारांचा विस्तार कोकणात ही होऊ लागला खानदेशात जलगावात जिल्ह्यात पवारांना जहागिरी मिळाली तेथे नगरदेवळा येथे सेनाबारसहस्ञी पवार म्हणून ओळखत आणि सांगलीत खानापूर तालुकात रेणावीतील पवारांना धारेराव हा खिताब आहे सोरटे पवार हे तळेगावचे धारकरी मानकरी यांना दाभाडेंकडून खिताब भेटला होता. तर वाल्हे गावातील पवार धारकर , वाल्हे , भांब्रुर्डे, खोपोडी, नाथाची वाडी , मालेगाव बारामती , बेलवाडी , सासवड , घेरा सिहगड , भुगांव, भुकूम, खेळपाने, सोनवाडी , मोराची, चिंचणी, लिंगाळी, गराडे चिंचणी , खर्डा , श्रीरामनगर येथे पवार घराण्याचा विस्तार झालेला आहे.

शिवाजीराजे& गोमाजी नाईक पानसंबळ

शिवाजी महाराजांचे शस्त्र प्रशिक्षक सरदार गोमाजी नाईक पानसंबळ हे होते, ही वस्तुस्थिती खूपच थोड्या लोकांना माहिती असेल. गोमाजी नाईक यांच्या अखत्यारित शिवाजी महाराजांचे बालपणापासूनचे शस्त्र आणि युद्धनीतिचे प्रशिक्षण पूर्ण झाले होते. शहाजी राजांच्या लग्नानंतर लखोजी जाधवरावांनी मुलगी जिजाबाई यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या सैन्यातील उत्कृष्ट तलवारबाज आणि युद्धनीतितील पारंगत वीर, सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांची नेमणूक केली होती

शिवाजी महाराजांचे शस्त्र-प्रशिक्षण लखोजी जाधवराव यांनी नेमलेले प्रशिक्षक सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांचेकडूनच पूर्ण झाले. गोमाजी नाईक यांनी जिजाबाई आणि बाल शिवाजी हे शिवनेरी येथे असतानाच शिवाजी राजांच्या प्रशिक्षणाची सुरूवात केली होती. अगदी याच काळात सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांच्या सल्ल्यावरुन शिवाजी महाराजांनी लढवय्या पठाणी तुकडीला आपल्या सैन्यात सामाऊन घेतले होते

जिजाबाई आणि शिवाजी राजे हे इ.स. १६३६ ते १६३९ या कालावधीत शहाजी महाराजांसमवेत बंगलोर येथे वास्तव्यास होते. येथे देखील शिवाजी महाराजांचे पुढील प्रशिक्षण सुरुच होते. शिवाजी राजांना बालपणी सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांचेशिवाय सरदार बाजी पासलकर यांचे देखील तलवारबाजी आणि युद्धकलेतील निपुणतेचे मार्गदर्शन मिळाले होते

सरदार गोमाजी नाईक पानसंबळ हे सतराव्या शतकातील शिवाजी राजांच्या सैन्यातील एक पराक्रमी सरदार आणि मिलिटरी अॅडव्हायझर होते. ते शिवाजी राजांचे खरेखुरे गुरू होते. लखोजी जाधवराव यांनी ज्या इराद्याने त्यांची नेमणूक केली होती, अगदी तो इरादाच सार्थ करण्याचे काम जणू सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांनी केले होते

शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या काळात सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांनी शिवाजी राजांचे प्रशिक्षक बनून अशी दुहेरी भूमिकेतून काम करीत त्यांनी शिवाजी राजांना तलवारबाजी, घोडेस्वारी, युद्धनिती आणि शस्त्रांचा उपयोग कसा करावा, वगैरे गोष्टी शिकवल्या. या स्वराज्याच्या अंकुरातून शिवाजी महाराजांनी त्याचा पुढे वटवृक्ष बनवला

गोमाजी नाईक पानसंबळ यांनी शिवाजी राजांना तलवारबाजीचे प्रशिक्षण देतानाच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचे मराठा युद्धनीतितील मौलिक धडे दिले. गोमाजी नाईकांच्या विचाराच्या धड्यातून खूप सारे कष्ट घेत शिवरायांनी आपले कर्तृत्व निर्माण केले. आणि यातूनच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवत पुढे त्यांनी आपले स्वराज्य उभे केले

नाईक पानसंबळ हे आडनाव मराठ्यांच्या शहाण्णव कुळातील पवार कुळातील आहे. ते मध्यप्रदेशातील धार संस्थानच्या परमारराव उर्फ पवार यांचे वंशज आहेत. परमाररावांचा पुढे पवार असा अपभ्रंश होऊन, पवारातील काही लोक 'नाईक निंबाळकर' अशा पडनावाने राहू लागले. आणि याच नाईक निंबाळकर आडनावातील काही लोकांच्या आडनावात पुन्हा एकदा अपभ्रंश होऊन, ते 'नाईक पानसंबळ' असे झाल्याचे गोमाजी नाईकांच्या वंशजांमधून सांगितले जाते. *सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांचे गाव अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सडे हे असल्याचे सांगितले जाते.

पानिपत युद्धात शहीद झालेल्या पवार शूरवीर वीरांची नाव..

  • महाराजा राजे यशवंतराव पवार
  • नरसोजी पवार
  • धर्माजी पवार
  • कर्णानी पवार
  • बिंबाजी पवार
  • आप्पाजी पवार
  • दत्ताजी पवार
  • अनोजी पवार

उपनावे

  • प्रथम मुलूखगिरी करताना काही खितांब मिळाले त्या पुढे तेच खिताब आडनाव म्हणून रुजू झाले.
  • महिपतराव २) विश्वासराव ३) मुकूटराव ४) औषधराव ५) झुंझारराव ६) धारेराव ७) धारकर..
  • आरफळकर - संत ज्ञानेश्वर अन संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळाचे मालक हैबतबाबा अरफळकर मूळचे धार पवार ग्वाल्हेरचे शिंदे सरदार यांच्या सोबत कामगिरीवर असणारे हैबतबाबा हे सातारा मधील आरफळ गावचे. श्रीमंत शितोळे सरकारांच्या मदतीने आजच्या पालखी सोहळ्याचे लष्करी स्वरूप सरदार हैबतबाबा अरफळकर यांनी दिले.
  • निंबाळकर - फलटणचे प्रसिद्ध असलेले राजघराणे मूळचे धार पवार आहे. मूळ पुरुष निंबराज पवार यांनी वसवलेल्या निंबळक गावावरून निंबाळकर उपनाव प्राप्त झाले. थोरल्या महाराणी सईबाईसाहेब याच निंबाळकर घराण्यातील.
  • विश्वासराव - हे शिवपूर्व व शिवकाळातील प्रसिध्द धार पवार घराणे. नगरदेवळे येथील पवार घराणे तसेच कोकणात राजापूर येथे कुरंग कोंडगे येथें तर पनवेल येथील काल्हे गावात विजयराव विश्वासराव (शिवनेरी किल्लेदार) यांची शाखा आहे.
  • दळवी - हे शिवकालीन धार पवार सरदार घराणे आहे. यांचे मूलस्थान कोकणात पालवणी गावात होते. मुळशी तालुक्यात आंबवणे येथील दळवी घराणे सुद्धा ऐतिहासिक आहे. दलाचे अधिपती असल्या दळवी हे आडनावं झाले.
  • ढवळे - इस १३०० च्या सुमारास अबु येथील रणधवल परमार (पवार) घराण्याचा मूळ पुरुष दक्षिणेत आला. त्यांनी ढवळ व नांदवळ गावे वसवली. ढवळचे पवार फलटणच्या निंबाळकर यांच्या पदरी सरदार होते.
  • पाणसंबळ - छत्रपती शिवाजी महाराजांचे शस्त्र-प्रशिक्षण लखोजी जाधवराव यांनी नेमलेले प्रशिक्षक सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांचेकडूनच पूर्ण झाले. गोमाजी नाईक यांनी जिजाबाई साहेब आणि बाल शिवाजी हे शिवनेरी येथे असतानाच शिवाजी राजांच्या प्रशिक्षणाची सुरूवात केली होती. नाईक पानसंबळ हे आडनाव मराठ्यांच्या शहाण्णव कुळातील पवार कुळातील आहे. ते मध्यप्रदेशातील धार संस्थानच्या परमारराव उर्फ पवार यांचे वंशज आहेत. परमाररावांचा पुढे पवार असा अपभ्रंश होऊन, पवारातील काही लोक 'नाईक निंबाळकर' अशा पडनावाने राहू लागले. आणि याच नाईक निंबाळकर आडनावातील काही लोकांच्या आडनावात पुन्हा एकदा अपभ्रंश होऊन, ते 'नाईक पानसंबळ' असे झाल्याचे गोमाजी नाईकांच्या वंशजांमधून सांगितले जाते. सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांचे गाव अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सडे हे असल्याचे सांगितले जाते.
  • जगदाळे - श्रीमंत जगदाळे हे धारच्या पवार घरण्याची शाखा. पानिपतच्या युध्दात आपल्या पराक्रम मूळ प्रसिद्ध. बहमनी काळापासून या घराण्याला १६८ गावाचा मसूर परगणा व देशमुखी होती. मसुरे गराडे व दौंड लिंगळे येथे दिडशे गावाची सरपाटिलकी मिळाली. जगदेवराव जगदाळे हे मूळपुरुष समजले जातात
  • औषधराव - वैद्यकीय ज्ञान व वैद्यकीय व्यवसाय असणाऱ्या धार पवार घराण्याची हि शाखा . औषधराव म्हणजे राजवैद्य, वैद्य. हेच पुढं औषधराव चे अपभ्रंश. मावळ, मुळशी तालुक्यात या घराण्यांचे वास्तव्य आहे.
  • धारेराव - सांगली जिल्ह्यातील रेणावी गावातील आपल्या कामगिरीच्या जोरावर पवार घरण्याला धारेराव हा खितांब.
  • धारकर- पुणे जिल्ह्यातील वाल्हे गावातील धार पवार घरण्याला धारकर हा खितांब. छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत असणाऱ्या सरदार तुकोजीराव पवार ह्याच गावचे.
  • सोरटे - पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील हे मूळ धार पवार घराणे. आपल्या सरदारकी बरोबरोच मानशिरकरी हा खितांब.
  • वाघळकर - सुपेकर - आपल्या वतन मिळलेल्या गावात वास्तव्यामुळे धार पवार वाघाळे येथील वाघळकर तर सुपे येथील सुपेकर म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • पंडीत - कोकणात काही गावातील मंदिरात पूजेचा मान असल्या मुळे पंडित उपणाव झाले. प्रसिध्द कासोटीपटू चंद्रकांत पंडित हे ह्याच धार पवार घराण्यातील.
  • सावंत - कोकणात असलेले हे मूळ धार पवार घराणे. आपल्या स्वकर्तुत्वाने वर आले. नर्मदेच्या पलीकडे जाऊन हल्ला केलेला पाहिले मराठा सरदार हे कृष्णजी सावंत हे मूळ धार पवार.
  • गूढेकर , घोसाळकर , पटेल ,बणे , गढीकर , सावंत , विश्वासराव , पंडित , सोरटे, कवडे, पोकळे, भरम , वाघ , नातू , वैद्य ,धनवडे ,विश्वासराव, निंबाळकर, जगदाळे, औषधराव,सरोदे,घोसाळकर, वाकचौरे , कांचन धार पवार घरण्याची उपणावे...
  • उत्तर भारतात पणवार , परमार , पँवार , पुवार तर गॊवा भागात पोवार असा उल्लेख करतात.
  • श्रीशिवछत्रपती चरणी तत्पर...!!
    श्रीमंत राजे पवार घराणे निरंतर...!!

आमचा पत्ता

३०८ , गणेश पेठ, पुणे, महाराष्ट्र 411 001

फोन : ९८२२३४९७१२

फोन : ८०८७१००७७७

फोन : ९१७२५८५०४५

ईमेल : pawargharane@gmail.com

लोकप्रिय उपक्रम